अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल,,विविध मागण्यासाठी राज्यभर आंदोलन..

प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे :- गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडे केलेल्या मागण्या पुर्ण न झाल्याने पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांनी राज्यभर संप पुकारला आहे. या संपामध्ये अनेक अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असुन 3 4 दिवसांपासून शाळा बंद असल्याने विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होताना दिसून येत आहे.

अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोणत्याही सरकारकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने पुन्हा न्याय मिळण्यासाठी राज्यभरातील अनेक अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत.त्यांच्या पोषण आहार ट्रेकर हा मराठीत करावा, मानधनात वाढ करावी, पेन्शन योजना लागू करावी, व नवीन मोबाईल अंगणवाडी सेविकांना देण्यात यावा या मागण्या त्यांनी सरकारकडे मांडल्या आहेत.त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविका संपामध्ये सहभागी झाल्या असुन गेल्या 3 दिवसांपासून शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे विध्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर मोठा परिणाम होनार आहे.त्यामुळे आता राज्य सरकारकडुन कोणती पाऊले उचलली जाणार का अंगणवाडी सेविका संप मागे घेणार हेच पाहावे लागेल.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!