विकासकामांच्या नावावर दिवसाढवढ्या वृक्षांची कत्तल,मानोरा तालुक्यातील गव्हा येथील प्रकार

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिम:-मानोरा तालुक्यातील गव्हा येथे विकासकामांच्या नावावर दिवसाढवळ्या महाकाय वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल होत असुन प्रशासन माञ चुप्पी साधुन असल्याचे दिसते.महसुल प्रशासन तसेच वनविभागाने याविषयी चौकशी करुन दोषींवर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.


संपुर्ण जगात कोरोणाने हाहाकार माजवला होता अशातच आॅक्सीजन अभावी हजारोंचे जीव गेले.या पार्श्वभुमीवर मानवि जिवनात आॅक्सीजनचे कीती महत्व आहे हे सर्वांनाच ऊमगले.यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक संघटनांनी वृक्षारोपन आणी वृक्षसंवर्धनाला अधिक महत्व देवुन झाडे लावन्याची मोहिम सुरु केली.दशकोटी वृक्षलागवडीसारखे स्तुत्यपुर्ण ऊपक्रमही केंद्रसरकारने राबवून सर्वांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवुन दिले.कोरोनाकाळात तर या झाडांचे मानवि जीवनात कीती महत्व आहे ते सर्वांच्या लक्षात आणून दिले.

असे असतांना माञ मानोरा तालुक्यातील गव्हा या ठिकाणी शासकीय जागेतील काही झाडे दिवसाढवढ्या जमिनदोस्त केल्याची माहीती मिळाली असुन कुणाच्या परवानगीने ही झाडे तोडण्यात आली याविषयी चौकशी होणे आता गरजेचे बनले आहे.मिळालेल्या प्राप्त माहीतीनुसार स्थानिक प्रशासनाने वरिष्ठ प्रशासनाला न जुमानता हम करे सो कायदा याप्रमाणे परवानगी न घेता सदर झाडे नेस्तनाबूत करण्याचा प्रकार केला असल्याने वन विभाग आणी महसुल प्रशासनाने याविषयी तात्काळ माहीती घेवुन घटनास्थळाचा पंचनामा करुन विनापरवानगी झाडे तोडणारांवर व तसे आदेश देणारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी पर्यावरणप्रेमींकडुन मागणी होत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!