*चासकमान धरण 91% भरल्याने भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू*

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे :- खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भागात असलेले चासकमान धरण हे मुसळधार पावसामुळे 91% भरले आहे त्यामुळे भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.चासकमान धरण हे अनेक शेतकरी वर्गाला वरदान ठरले आहे. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भागात असलेल्या या धरणाची क्षमता ही 8.50 टीमसी आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात मागील वर्षी जुलै महिन्यात आज दिनांक 17 जुलै रोजी धरण फक्त 21 %भरले होते. परंतु गेल्या 5 दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण लवकर भरण्यात सुरूवात झाली आहे.आज अखेर धरणात 91% भरले असुन भीमा नदीपात्रात 2428 क्यूसेक वेगाने 5 ही दरवाजातून पाणी सोडण्यात येत आहे. अशी माहिती चासकमान प्रकल्पाचे शाखा अधिकारी उत्तम राऊत यांनी दिली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!