एस.टी.कर्मचाऱ्यांचा अजुनही संप सुरुच,शासनाने तोडगा काढण्याची मागणी

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम:-अत्यंत हलाखीच्या परिस्थीतीत आपले इमानेईतबारे कर्तव्य बजावणार्‍या एस टी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आतातरी आम्हाला शासनामध्ये विलिनीकरण करुन आवश्यक सोईसुविधा ऊपलब्ध करुन द्या या मागणीसाठी पुकारलेला संप अजुनही सुरुच असुन प्रशासनाने त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरत आहे.


तुटपुंज्या पगारावर आपले कर्तव्य बजावणारे एस टी महामंडळाचे कर्मचारी आता शासनामध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीसह कर्तव्यावरील कर्मचार्‍यांना सोईसुविधा पुरवाव्यात अशा मागणीसाठी कर्मचारी एकजुट होवुन न्याय मिळन्यासाठी आक्रमक झाले असुन संपाचे हत्यार ऊपसले आहे.

मागील काही दिवसांपासून एस.टी.कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या या काम बंद आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी,भाजपा,युवा सेवा,प्रहार जनशक्ती पक्ष,मनसे,मुलनिवासी संघटना,संभाजी ब्रिगेड आदी पक्ष आणी संघटनांनी पाठिंबा देत कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजूत घेत पूर्ण शक्तीनिशी एस.टी.कर्मचाऱ्यांच्या सोबत उभे असून कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा एसटी कर्मचार्‍यांना त्यांच्या मागणीसाठी पाठींबा देणार्‍या पक्ष आणी संघटनांनी दिला आहे.मागील काही दिवसांपासून एस.टी.कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन महाराष्ट्रभर सुरू आहे. एस.टी.महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, ही प्रमुख मागणी आहे. ही मागणी रास्त असून कामगारांनी पुकारलेल्या संपास अनेकांनी पाठींबा दिला आहे.या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्यास व कामगारांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केल्यास पाठींबा देणारे पक्ष संघटनाकडुन आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन मंगरुळपीर आगाराचे आगार व्यवस्थापक यांना दिले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!