बैलगाडा शर्यतीची नवी नियमावली जाहीर, अंतराची अट, तर यावर मनाई…!

पुणे: सध्या महाराष्ट्राभर यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती भरविण्यात येत आहेत. जेव्हा पासून बैलगाडा शर्यती सुरू झाल्या तेव्हा पासून बैलांना दुखापत, कुठे अमानुष वागणूक अशा गंभीर घटना समोर येत होत्या. याच घटनांच्या अनुषंगाने प्राणीमित्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने काही नियमावली जाहीर केली आहे.

त्याच सुनावणीच्या आदेशानुसार शर्यतीसाठी शासनाकडून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडून आयोजकांच्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. यापुढील काळात बैलगाडा शर्यतीचे आयोजन संयोजकांना करावे लागणार असल्याची माहिती साताऱ्याचे प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी रिचर्ड यानथन यांनी दिली आहे.

👉🏻नियमावली👈🏻

  • बैलांच्या वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र आवश्यक..
  • स्पर्धेतील सहभागी बैलाचे छायाचित्र…
  • ठरलेल्या गाडीवाहनास ओळखपत्र..
  • ठरलेल्या गाडीवाहनालाच सहभागी होण्याची परवानगी…
  • शर्यतीसाठी फक्त एक हजार मीटर अंतराची अट..
  • शर्यतीसाठी योग्य धावपट्टी आवश्यक…
  • बैलावर काठी, चाबूक अशा कुठल्याही प्रकारच्या वस्तूंचा वापर करण्यास मनाई…
  • बैलांना कोणतेही उत्तेजक औषधी व मादक द्रव्य देण्यास मनाई…
  • स्पर्धेवेळी पशु रुग्णवाहिका असणे आवश्यक…
  • शर्यतीचे चित्रीकरण करून उपविभागीय अधिकाऱ्यास सादर करणे बंधनकारक…
  • वरील कोणत्याही शर्तीचा भंग झाल्यास अनामत रक्कम जप्तीसह कारवाई होणार…

वरील प्रमाणे यापुढे बैलगाडा शर्यतींना नियमावली लागू करण्यात आली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!