एक गाडी गेली मातीत तर दुसरी भंगारात जाण्याच्या तयारीत ,जिल्हा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तहसील कार्यालय येथे कार्यरत असलेली तहसीलदारांची गाडी दोन वर्षापासून एकाच जाग्यावर स्थित असून दोन वर्षापेक्षा ही जास्त दिवस झाले असावे, चांगल्या कंडीशनमध्ये असलेली गाडी काही तांत्रिक कारणाने बंद पडली आज ती मातीत चालली आहे, माकडांनी उड्या मारल्यामुळे गाडीचे काच वगैरे फुटले आहेत, हे सर्व असताना जिल्हा प्रशासन दुरुस्ती करता निधी देत नाही किंवा लिलाव करत नाही, त्यामुळे या गाडीची परिस्थिती ही दयनीय झाले असून, तिच्यापाठोपाठ तिच्यासमोर पुन्हा तहसीलदाराची दुसरी गाडी हे सुद्धा गेल्या आठ पंधरा दिवसापासून बंद पडलेली आहे. तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांची गाडी वापरत आहेत,

,म्हणजेच आज ना उद्या पुन्हा तहसीलदाराची दुसरी गाडीही मातीत जाण्याकरिता उभी असल्याचे दिसून येत आहे, तेव्हा आतातरी जिल्हा प्रशासनाने योग्य ते उचित कारवाई करून योग्य भावात जिल्हा स्तरावर गाडीचा लिलाव करून दोन रुपये का होईना शासनाच्या तिजोरीत जमा करावे व दुसरी गाडी तांत्रिक कारणाने बंद असून तिच्या करता सुद्धा निधी द्यावा, अशी मागणी पावर ऑफ मीडिया अमरावती जिल्हा उपाध्यक्ष गजानन देशमुख, दर्यापूर तालुका पावर ऑफ मीडिया अध्यक्ष शशांक देशपांडे, कार्याध्यक्ष विनोद पाटील शिंगणे आदींनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!