विद्यार्थी जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द आवश्यक-न्यायाधीश योगेश आखरे ,तोंगलाबाद येथे ‘रासेयो’च्या श्रमसंस्कार शिबीराचा समारोप

दर्यापूर – महेश बुंदे

विद्यार्थी जीवनात यशस्वी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य,नियमित सराव,जिद्द आवश्यक असल्याचे प्रतिपादन दर्यापूर न्यायालयाचे न्यायाधीश योगेश आखरे यांनी केले,ते येथील जिजामाता महिला मंडळ द्वारा संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयाच्या वतीने दत्तक ग्राम तोंगलाबाद येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या समारोपिय कार्यक्रमात बोलत होते.


दि. २२ मार्च ते २८ मार्च दरम्यान शिबीर संपन्न झाले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जे.डी.पाटील स्मृती केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण गावंडे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दर्यापूरचे तहसीलदार डॉ योगेश देशमुख,दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश योगेश आखरे,ठाणेदार प्रमेश आत्राम,महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अण्णासाहेब रेचे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश चौखंडे,ग्रामपंचायत सरपंच वैशाली निरंजन पानझाडे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले आदी उपस्थित होते.

यावेळी शिबिराला विशेष सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत सरपंच वैशाली निरंजन पानझाडे,जि.प.मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोले,सामाजिक कार्यकर्ते डॉ.गोपाल जऊळकार,धनंजय देशमुख यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना दर्यापूरचे तहसीलदार डॉ योगेश देशमुख म्हणाले की,विद्यार्थी जीवनात अशा श्रमसंस्कार शिबिरात आपण सहभागी होऊन आपली सर्वांगीण प्रगती करू शकतो,या माध्यमातून आपल्याला समाजाचे सोशल ऑडिट करता येते. राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आपल्याला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देते असे प्रतिपादन ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश चौखंडे यांनी गावकऱ्यांनी केलेल्या सहकार्य बद्दल आभार मानले.अध्यक्षीय भाषणात कुलभूषण गावंडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सात दिवसातील शिबिराबद्दल शिबिरार्थी जया बीजवाडे व गीता राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


या शिबिरात दररोज सकाळी ६ वाजता सुरुवात होते,यामध्ये प्रार्थना व,योगासने,प्रभातफेरी,अल्पपोहर,श्रमदान,दुपारी भोजन व बौद्धिक सत्र तर रात्री प्रार्थना व स्फूर्ती गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. देवलाल आठवले तर संचालन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ हरिदास आखरे आणि आभार मानले प्रा.डॉ. ज्योती हावरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गजानन हेरोळे,प्रा.डॉ.दीपक मोरे,प्रा.डॉ.रवी डाखोरे,प्रा.डॉ.चंदा खंडारे,प्रा.डॉ.कोकिळा गावंडे,प्रा.डॉ.अर्चना तिवारी,प्रा.डॉ. शुभांगी इंगोले व शिबिरार्थी विद्यार्थीनी यांनी सहकार्य केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!