प्रतिनिधी धीरज पंवार
चांदूर रेल्वे :- महाविद्यालय, संस्थेतर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर गावपातळीवर राबविण्यात येते. ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीवन, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, रूढी-परंपरा अनुभवण्यासाठी हे शिबिर उपयोगी ठरतात.

विविध परिस्थिती जुळवून घेण्याची कला या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होत असते या दृष्टीने जीवन जगण्याचे कौशल्य मिळते. याचाच भाग म्हणुन चांदूर रेल्वे आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी राजना गावात साफसफाई अभियान राबवित तांत्रिक शिक्षण प्राप्त करीत असल्यामुळे गावकऱ्यांची तांत्रिक कामे सुध्दा करून दिली.

पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत हॉलमध्ये प्राचार्य डॉ. राजेश शेळके यांच्या हस्ते पार पडले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चंद्रमुनी गजभिये, गटनिदेशक के. एस. शहाडे, कार्यक्रम अधिकारी मारोती मर्दाने, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एस.डब्लू. गुल्हाणे उपस्थित होते.

सात दिवसीय शिबिरात साफसफाई अभियानासह करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास व समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन व चमत्कार या विषयावर बार्टीचे समतादूत सलीम खान पठाण, शुभांगी बोराळकर, दुर्गा झाडे तसेच व्याख्याते कमलकिशोर पनपालीया यांनी सखोल मार्गदर्शन केले. दररोज सकाळी श्रमदानातून ग्रामसफाई विद्यार्थ्यांनी केली. याशिवाय राजना येथील सार्वजनिक व घरगुती उपकरणांची, गावातील विद्युत उपकरणांची दुरुस्ती तसेच ग्रामपंचायत व गावात पेंटिंगची कामे केली. वेल्डींगची सुध्दा कामे गावात प्रशिक्षणार्थ्यांनी केली. या शिबीरात योगाचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना शरद बेहरे यांनी दिले.

विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातील हॉल उपलब्ध करून देण्यात आला होता. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश शेळके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चंद्रमुनी गजभिये, उपसरपंच संध्या गावंडे, गटनिदेशक के. एस. शहाडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी मारोती मर्दाने आदींची उपस्थिती होती. समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

शिबीराच्या यशस्वीतेकरिता आयटीआयचे शिल्पनिदेशक के. के. शिसोदे, पी. के. वारकड, एन. एन. वसुले, एस. एन. ठाकरे, के. एस. चौधरी, ए. वाय. खडसे, एस. डब्लू. गुल्हाणे, पी. डी. पाचपोर, गजानन भडांगे, शहजाद खान, एस. व्ही. निमकंडे, टी. बी. टांगले, शरद बेहरे, सुरज चांदूरकर, सुधाकर कांबळे, सुमित वलीवकर, ए. एस. लव्हाळे, जयश्री रंगारी, कर्मचारी नंदा आत्राम, एन. के. शेळके, जी. एच. राठोड, आर. आर. कनोजे, श्रीमती रामटेके, सुरक्षारक्षक देवानंद वाघमारे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. याकरिता ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंंच, सचिव, पदाधिकारी, गावकऱ्यांनी सहकार्य केले.

