विशेष प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे
केंद्रशासनाच्या नवीन शालेय धोरणाची अंमलबजावणी कशी करावी तसेच गेली दोन वर्षातील करोना काळातील विद्यार्थांचे झालेले शैक्षणिक नुकसान कमी करुन मुलांची शैक्षणिक आवड पुर्नःप्रस्थापित करणे व पुढील शैक्षणिक वर्षात नव्या जोमाने शैक्षणिक सुरुवात करणे हा मुख्य उद्देश या प्रशिक्षणाचा असल्याचे मार्गदर्शक शिक्षक संतोष तळोले व सुनंदा कारोटे यांनी सांगितले. या कामी पालकांचे मेळावे घेऊन त्यांचे उद्बोधन करणे ,मुलांची प्राथमिक मानसिकता तयार करणे महत्वाचे असल्याचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांनी सांगीतले .इयत्ता पहिली ते पाचवी चे सर्व शिक्षक व अंगणवाडीच्या कार्यकत्या यांना हे प्रशिक्षण देण्यात आले.
