पुणे,वार्ता :- : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसाठी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वय ठेवत नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र भीमाशंकर यात्रा नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, आंबेगावच्या तहलिसदार रमा जोशी, खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, उपअभियंता एस.एस. पटाडे, पोलीस निरीक्षक सतिश गुरव, किशोर वागज यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.
