चिंबळी | यंदाच्या मोसम बदलाचा अवकाळीचा शेतीला फटका

चिंबळी दि २४(वार्ताहर सुनील बटवाल ) यंदाच्या मोसमात अवकाळीचा फटका शेतीला बसला.ऑक्टोबरमध्ये पिकाला पीळ पडली तर डिसेंबरमध्ये कांद्याच्या वाफ्यात खच्चून पाणी भरले.अवकाळीच्या फटक्यात कांदा पीक,शेती वाहून गेली अशा हलाकीच्या परिस्थितीत डोळ्यात आलेले पाणी पुसत शेतकऱ्यांनी जिद्दीने उरले सुरले पीक जगवले असून हंगाम तारला आहे.चिंबळी(ता.खेड) परिसरात काही शेतकरी वर्गानी  नियोजन बद्ध यशस्वी प्रयत्नांचे शेतकरी वर्गाकडून कौतुक होत आहे.सद्या या परिसरात शेतात कांदा काढणी सुरू असून उत्पादन घटले असले तरी पीक किमान उत्पादनात आले असल्याचे समादान शेतकरी व्यक्त करत आहेत.

सततच्या वातावरण बदलाचा , अवकाळी पावसाचा तडाखा मुख्यत्वे कांदा व इतर पीकांना यंदा चांगलाच बसल्यामुळे एकीकडे शेतकरी पुरतां हवालदील झाल्याचे  दिसून आले.अनेकांनी  कांदा पीकात मेंढरं-बकरं सोडली, रोटावेटर फीरवला मात्र चिंबळी येथील शेतकऱ्यांनी हातच गेलेले पीक जगवत उत्पादन घेत दुसरीकडे संयम, सातत्य, जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजन करून ल समाधानकारक उत्पादन घेत एक उदाहरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.या परिसरातील
  शेतकरी वर्गानी   सांगितले की सुरवातीपासूनच वातावरण बदलामुळे कांदा रोपाला पिळपडणे, बुरशी येणे यामुळे रोपांचे प्राथमिक काळात नुकसान झाले. तसेच लागवडीनंतर अवकाळी पावसामुळे , वातावरण बदलामुळे दुसर्यादा कांद्याचे दुप्पट नुकसान झाले. अशा संकंटाना तोंड देत योग्य नियोजनाचा प्रयत्न करून उत्पादन घेणे व विक्री योग्य बनवणे यांत तारेवरची कसरत करावी लागली मात्र त्याला यश आल्याने समादान वाटत आहे
प्रगतिशील शेतकरी हनुमंत कातोरे 

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!