मग्रारोहयो : मजुरांना काम मागण्याचा अधिकार ; पैशाची मागणी ही अफवा

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-जिल्ह्यात ग्रामपंचायत क्षेत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहे.रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी करण्यासाठी आणि डिमांड टाकण्यासाठी कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी करण्यात येत नाही. तसेच मस्टरमध्ये जवळच्या नातेवाईकांची नावे टाकण्यात येत नाही. ज्या मजुराजवळ जॉब कार्ड उपलब्ध आहे व ज्यांचे वय १८ वर्षाच्या वर आहे अशा कोणत्याही मजुरांना रोजगार हमी योजनेमध्ये काम मागण्याचा नियमानुसार अधिकार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच तसेच नागरिकांनी रोजगार हमी योजनेच्या कामाची मागणी करण्यासाठी व डिमांड टाकण्यासाठी पैशाची मागणी करण्यात येते या अफवेला किंवा आरोपांना बळी पडू नये. रोहयोची कामे करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पैशाची मागणी होत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम किंवा हेल्पलाईन क्रमांक १०६४ यावर संपर्क साधावा. असे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांनी केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!