वाइन विक्री विरोधात रीपाईचा एल्गार, तहसीलदारांना निवेदन, सरकार विरोधी घोषणा

दर्यापूर – महेश बुंदे

राज्यातील आघाडी सरकारने सुपर मार्केट व जनरल दुकानात वाईन विक्री करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगत दर्यापूर रिपाईने सरकार विरोधात एल्गार केला असून दर्यापूर तहसील कार्यालयात या संबधी निवेदन देत सरकार विरोधी घोषणा दिल्या आहेत, सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मार्केट मधून वस्तू खरेदी करताना त्रासदायक होणार असल्याने तथा यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त करण्याच्या मानसिकतेला बळ मिळणार आहे, असेच जर असेल तर शेतकऱ्यांना गांजा पेरण्याची सुद्धा परवानगी देऊन टाकावी अशी मागणी केली आहे, अशा प्रकारचा तुघलकी निर्णय जनतेवर थोपवणे अत्यंत चुकीचे असून याविरोधात रिपाई ठिकठिकाणी आंदोलन करणार असल्याचे सांगत, सदर निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी केली आहे.

दर्यापूर तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले असून गोरगरीबांच्या प्रश्नांना सरकारने महत्व न देता वाईन विक्री करणे चूक असल्याचे सांगितले आहे.

यावेळी रिपाईचे तालुका अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, शहर अध्यक्ष अनिल गवई, हिम्मतराव चोरपागार, आकाश डोंगरे, लक्षणराव सावळे, अनिल भोरखडे, देविदास भौरखडे, सहदेव इंगळे, रशीद खान, राजू गवई, निरंजन गवई, सुधीर वानखेडे, प्रवीण भोरखडे, आदित्य खडे, आनंद लहू पंचांग, हेमंत नितनवरे, लक्ष्मण गवई, देविदास गवई, आनंद घरडे, भास्कर डोंगरदिवे आदींची उपस्थिती होती.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!