पारद धरणात तीन जण बुडाले, दोन जणांचा मृत्यू ; बचाव पथकाकडून आई आणि मुलीचा शोध सुरू

दर्यापूर – महेश बुंदे

पारद धरणावर गेलेल्या परिसरातील ३ जणांपैकी २ जण पाण्यात बुडाल्याची दुदैवी व धक्कादायक घटना (दि.०६) सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. गौरव तायडे (वय ३०) सौ. प्रिया गौरव तायडे (वय २४) कुमारी आराध्या गौरव तायडे (वय ३) हे सर्व दर्यापुर तालुक्यातील घोंशी गॅरेज धरणावर सकाळी ८ वाजता धामोडी वरून पारद येथे त्यांच्या घरी जाताना आई आणि मुलगी पाय घसरल्याने पाण्यात पडले, त्यांना वाचविण्यासाठी त्यातील गौरव तायडे (वय ३०) याने उडी घेतली मात्र संबंधित वाचमनने हे दृश्य बघितले व तेथील भोई समाजातील लोकांनी पाण्यातून उतरून त्याला वर काढले.

या घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर दर्यापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, सहायक पोलिस निरीक्षक किरण औटे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले.

याचवेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणिकर, तहसीलदार योगेश देशमुख,
हिंगणी मिर्झापुर येथील पोलीस पाटील हरिदास पातोंड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बचाव कार्यात अमरावती जिल्हा कार्यालय अंतर्गत बचाव पत्रक, गावकरी सहभागी झाले आहेत. या घटनेने पारद परिसरात शोककळा पसरली होती.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!