सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी ; सैन्य भरतीची तारीख जाहीर करा

दर्यापूर – महेश बुंदे

गेल्या दोन वर्षापासून देशात व राज्यात कोरोना सारख्या महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि त्यामुळे राज्यात सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यावर राज्यशासनाचे व केंद्र शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मुळात सैन्य भरतीसाठी वयोमर्यादा ही २१ ते २३ वर्षापर्यंत असते. परंतु कोरोनामुळे गेल्या तीन वर्षापासून भरतीची तयारी करत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे वय हे भरतीसाठी अपात्र ठरत आहे.

गेल्या तीन वर्षापासून जिद्दीने भरतीचे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मौलिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी केंद्र शासनाने व राज्य शासनाने सदरील बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घ्यावा, सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय वाढवून मिळावे, अशी मागणी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!