अखेर मंगरुळपीरच्या तिन तलाठ्यांची विकेट पडली

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-मंगरूळपीर तहसिलचा बहूचर्चीत घोट्याळ्यामुळे अखेर तिन तलाठ्यांना वरिष्ठ प्रशासनाने निलंबित केल्याने महसुल विभागात खळबळ ऊडाली आहे.


गेल्या दिड ते दोन वर्षापुर्वी मंगरूळपीर तहसिलमध्ये अतिवृष्टीच्या निधी वाटपामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते.अनेकांनी यासंदर्भात सबंधित प्रशासनाला लेखी तक्रारी करुन सखोल चौकशीची मागणी केली होती.वृत्तपञांनीही ही मागणी रेटुन धरली होती.त्यानंतर या कथीत भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीसमिती प्रशासनाने नियुक्त करुन चौकशी केली.यामध्ये दोषी आढळलेल्या मंगरूळपीरच्या तत्कालीन तहसिलदारांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आले होते.

या अतिवृष्टी निधी वाटपामधील अनियमितता आणी कथीत भ्रष्टाचारामध्ये आणखीही काही महसुलचे कर्मचारी सामिल आहेत का याचीही चौकशी प्रशासकीय स्तरावरून करन्यात आली.अतिवृष्टीचा मदतनिधी पाञ शेतकर्‍यांना वितरीत न करता भुमिहिनांच्या खात्यात पाठवल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते.मंञालयामध्येही याप्रकरणी पाठपुरावा करण्यात आला होता.या कथीत भ्रष्टाचारामध्ये अजुनही काही मंगरूळपीरचे महसुल कर्मचारी असल्याचे चौकशीअंती समोर आल्याने मंगरूळपीर येथील तिन तलाठ्यांना अखेर तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.याप्रकरणी आता आणखी कुणाची विकेट पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!