सिन्नर येथील पीडित तरुणीची आत्महत्या करून गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी ; आळंदी येथे सर्व समाजाच्या वतीने कॅन्डल मोर्चा

पुणे वार्ता :- सिन्नर येथील पीडित तरुणीची आत्महत्या करून गैरकृत्य करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी म्हणून आज खेड तालुक्यातील श्री क्षेत्र आळंदी येथे सर्व समाजाच्या वतीने ॲड. एस. एस. आघाव यांनी कँडल मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर संत भगवान बाबा युवक संघटना, जय भगवान महासंघ, स्वाभिमानी संघर्ष सेना आणि इतर सर्व वतीने आळंदी पोलीस निरीक्षक यांना ऍड. एस. एस. आघाव, माऊली शेठ थोरवे, श्यांमबाला ताई भांगे यांनी निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

या मोर्चात माऊली शेठ थोरवे उपजिल्हा, प्रमुख संत भगवान बाबा युवक संघटना)३) संदीप भाऊ सांगळे स्वाभिमानी संघर्ष सेना अध्यक्ष४) किसन राव पालवे (रिको कंपनी mananger), ५)ह. भ. प.अशोक महाराज आघाव,६) ॲड.सचिन आंधळे, ७)ॲड.दीपक वणवे,८) संभाजी जायभाये, सर्जराव भांगे,राजू दराडे,संजय काकड, राजेश नारायण केदार, विष्णू कुऱ्हाडे, रामा दराडे, महादेव वायभासे, नारायण इंगळे, महादेव चाटे, विठोबा जायभाये,आणि इतर महिला सहभागी झाले… आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मोर्चात ॲड.एस.एस.आघाव यांनी केली आहे……

काय आहे घटना ………….

किरण राजेंद्र सानप (२५) या सिन्नर संजीवनीनगर भागात राहणाऱ्या युवतीने काही दिवसांपूर्वी (२८ डिसेंबर २०२१) राहत्या घरात ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सायंकाळी सातच्या सुमारास आजूबाजूच्या रहिवाशांच्या ही बाब लक्षात आली. स्थानिक नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस आले. त्यांनी तिची लहान बहिण लासलगावडून आल्यानंतर मृतदेह खाली उतरविला व नंतर अंत्यविधी करण्यात आला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद ३० डिसेंबरला केली.

पीडित किरण सानप

या घटनेला सात दिवस उलटल्यानंतरही युवतीच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी पोलिसांची तपासात ढिलाई  मात्र ही ‘आत्महत्या’ नसून ‘लव्ह जिहाद’मुळे तिला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले, असे पुढे येत आहे.’या आत्महत्येला धर्मांध रईस इब्राहिम शेख हा उत्तरदायी असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करावी’, अशी मागणी युवतीच्या मृत्यूबाबत सारेच संशयास्पद असून शवविच्छेदन अहवाल पाच दिवसापासूनही आलेला नाही. आत्महत्या राहत्या घरात केली मात्र दरवाजा उघडाच होता, तिच्या तोंडातून फेस आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संशयित पोलिसांच्या मर्जीतील असल्याचीही चर्चा सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार गळफास घेवून आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!