वर्दीलाही जाणीव निसर्गाची, प्राणीरक्षक बापूसाहेब सोनवणे

सध्या थंडीचा कडाका वाढू लागलाय .याचा फटका निसर्ग साखळी लाही बसत आहे .एकमेकांचे भक्ष्य असणारे जीव थंडीमुळे बाहेर पडत नाहीत परंतु त्यांच्यावर अवलंबून असणारे जीव उपाशी मरतात. असच काहीसं महाळूंनगे मध्ये झालं.

महाळूंनगे वाहतूक पोलीस चौकीच्या बाजूला असणाऱ्या उंच विजेच्या टॉवर वर घरटे करून राहणाऱ्या घारीच्या जोडीचे पिल्लू खाली कोसळले तेथील चौकीमध्ये कर्तव्यावर असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिद्र आदलिंग, हेड कॉन्स्टेबल रवींद्र तिटकारे,प्रमोद भोजने ,वाघमारे आदींनी धाव घेऊन त्याला पोलीस चौकीत आणून पाणी पाजले व त्वरित शासनमान्य सर्पमित्र प्राणिरक्षक बापूसाहेब सोनवणे यांना संपर्क केला सोनवणे यांनी जाऊन ते पाहिले असता ते घरीच पिल्लू खूप दिवसांचे उपाशी असल्याचे आढळून आले.

त्यांनी त्वरित त्याला वनविभागाच्या स्वाधीन केले चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन व वनरक्षक योगेश्वर पाटोळे यांच्या देखरेखीखाली त्याला पुढील उपचारासाठी बहीनाबाई चौधरी प्राणी अनाथालयात पाठवण्यात आले

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!