स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये आज शनिवारी झालेल्या आठवडे बाजारात कांद्याची आवक १५०० क्विंटलने कमी झाल्याने कांद्याचे भावात ७०० रुपयांची वाढ झाली.तसेच तळेगाव बटाट्याची आवक १७५० क्विंटलने कमी होऊन देखील दर स्थिर पाहायला मिळाला. परंतु टोमॅटो,वटाणा,गाजराची आवक भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे.आज भाजीपाला बाजारात कोथिंबीर २७,६५० व मेथीच्या १०, ३०० जुड्यांची कमी प्रमाणात आवक भाजीपाला बाजारात झाल्याने मेथीच्या भाजीच्या दरात मोठी वाढ झाली. भाजीपाला बाजारात मेथीच्या भाजीला २० रुपयांपर्यंत, कोथिंबीर जुडीला ९, शेपु भाजीला ८ ,पालक भाजीला १२ रुपये कमाल दर पाहायला मिळाला.

मात्र हिरवी मिरची व टोमॅटोची आवक होऊन देखील भावात कडाडले. भाजीपाला बाजारात कोथिंबीर, शेपु भाजीला दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्च, गाडी भाडे ,औषधे मजुरी देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना चिंता व्यक्त केली आहे.मात्र काही शेतकऱ्यांनी किरकोळ बाजारात कोथिंबीर शेपूच्या,पालकभाजीची विक्री केल्याने चांगला दर मिळालेला पाहायला मिळाला.

खेड तालुक्यातील ग्रामीण भागात रब्बी हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीकाचे उत्पादन घेतले जाते. चाकण मार्केटयार्डमध्ये देखील कांद्याचा मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने मोठी उलाढाल पाहायला मिळते.तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम संपल्यानंतर कांदा पिकाची लागवड केली.परंतु बदलते हवामान,अवकाळी पाऊस यामुळे अजुन नवीन कांदा बाजारात कृषी उत्पन्न बाजारात कांदा येण्यासाठी अजुन बराच कालावधी लागणार आहे.अलीकडे आताच काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात येण्यासाठी अवधी लागणार आहे.त्यामुळे कांदा पिकाची आवक कमी जास्त प्रमाणात होत असलेली पाहायला मिळत आहे.

मागील शनिवारच्या तुलनेत कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचा भाव वधारून कमाल ३४५० रुपयांवरून किमान १००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल पर्यंत मोठी वाढ होऊन पोहचला.व तळेगाव बटाट्याची भाव देखील प्रतिक्विंटलने 200 रुपयाने कमी होऊन कमाल १४०० ते ९०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच चाकण भाजीपाला मार्केट यार्डमध्ये ,हिरवी मिरची,कोबी,फ्लॉवर, वटाणा,गाजर,टोमॅटो मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळाली.

तसेच भाजीपाला बाजारात हिरवी मिरची,गवार, वांगी, शेवगा भाजीची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत.लसणाची देखील ४४ क्विंटल आवक होऊन भाव स्थिर राहिले.,आज झालेल्या आठवडे बाजाराची एकुण उलाढाल ३५ लाख रुपये इतकी झाल्याचे पाहायला मिळाली.
