चंडीकापूर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तालुक्यातील चंडीकापूर येथील एका शेतकऱ्याने नापिकीला व खाजगी कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. येथील शेतकरी राजू नामदेवराव गोलांडे (५०) यांनी बुधवारी (दि.८) राहत्या घरी गळफास घेऊ आत्महत्या केली. बँकेचा तगादा व इतर आर्थिक विवंचनेत या शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे. खोलापूर पोलिसांनाही घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!