रब्बी पिकांवर मर रोग व दव गेल्याने शेतकरी हवालदिल – दत्ता पाटील कुंभारकर

दर्यापूर – महेश बुंदे

यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात बरसात झाल्याने मुग, उडीद, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे बहुतांश शेतकरी संकटात सापडले होते त्यातून सावरत नाही तर रब्बी पिकांवर शेतकऱ्याची भिस्त, व आशा अवलंबून आहे कारण अतिवृष्टीमुळे मुग उडीद, सोयाबीन पिकांचे खुप नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्याची तूर व हरभरा पीक जोमात येईल असे वाटत होते परंतु विविध पिकांवर येत असलेल्या रोगामुळे चांगल्या पिकाची आशा मावळत आहे.

दर्यापूर तालुक्यातील शेतकरी हरभरा व तूर पिक चांगले होईल या आशेवर आहेत पण आज पिकांवर जो रोगराईचे सत्र चालू आहे त्यावरून असं वाटत की रब्बी पीकही हातातून जाते काय अशी शंका वाटत आहे कारण हरभऱ्यावर मर रोग येत आहे तर तुरी वर दव जाण्याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे यावर वेळीच उपाय योजना शेतकऱ्यांनी करावी अशी विनंती दत्ता पाटील कुंभारकर यांनी शेतकऱ्यांना केली आहे .

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!