प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दरवर्षी निघणाऱ्या आषाढी वारीच्या पालखी सोहळा प्रमुखपदी संस्थानचे योगी निरंजन नाथ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या कमिटीवर काम करत असताना अनेक कार्यभार त्यांनी संभाळला होता.

दिनांक 29 मार्च 2024 रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त मंडळाची मासिक बैठक आळंदी देवस्थान कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सन 2024च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पालखी सोहळा प्रमुख म्हणून संस्थान चे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी ऍड राजेंद्र बा. उमाप, प्रमुख विश्वस्त, डॉ. भावार्थ रा. देखणे, विश्वस्त आणि योगी निरंजन नाथ विश्वस्त उपस्थित होते.