दिल्ली सरकारचे प्रदूषण नियंत्रण संबंधीच्या जाहिरातींवर तब्बल 940 कोटी रुपये खर्च,ठपका दिवाळीत उडवलेल्या फटाक्यांवर

नवी दिल्ली : दिल्लीतल्या प्रदूषणाच्या बातम्या दिवाळीच्या ऐन सणामध्ये मोठ्या प्रमाणावर माध्यमांमध्ये येत असताना एका आरटीआय मधून एक धक्कादायक खुलासा बाहेर आला आहे.

दिल्ली सरकारने गेल्या सात वर्षांमध्ये प्रदूषण नियंत्रण हा संबंधीच्या जाहिरातींवर एक – दोन, नव्हे तर तब्बल 940 कोटी रुपये खर्च केले आहेत. पण प्रत्यक्ष प्रदूषण नियंत्रणाबाबत मात्र दोन्ही हातांनी “शंख” वाजविल्याचे दिसत आहे.!!

करोनामुळे आधीच जीवनाची धास्ती असलेल्या वृद्धआंचे आयुष्य आणखी काही वर्षांनी कमी होओ आणि जीवन विकारयुक्त होओ, इथं राज्य सरकार असूनही ती डोळ्याला झापडं लावून बसलेली आहेत.जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून राजधानी पहिला क्रमांक सोडायला तयार नाही, मग त्यामुळे कित्येकांना दमा होओ, फुफ्फुसाचे विकार होओ, श्वसनाचा त्रास होओ, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थांचे आरोग्य बिघडो, करोनामुळे आधीच जीवनाची धास्ती असलेल्या वृद्धआंचे आयुष्य आणखी काही वर्षांनी कमी होओ आणि जीवन विकारयुक्त होओ, इथं केंद्र व राज्य अशी दोन सरकारे असूनही ती डोळ्याला झापडं लावून बसलेली आहेत. त्यामुळे दिल्लीकर बेजार झाला नाही, तरच नवल.

दिल्लीतील अमित गुप्ता यांनी दिल्ली सरकारकडे माहिती अधिकारात दिल्लीतील प्रदूषणाच्या बाबत दोन नेमके प्रश्न विचारले होते. दिल्ली सरकारने प्रदूषण नियंत्रणाच्या प्रचार-प्रसारासाठी किती खर्च केला? आणि प्रत्यक्ष प्रदूषण नियंत्रणासाठी किती खर्च करुन कोणती उपाययोजना केली? हे ते दोन प्रश्न होते.

त्यांना दिल्ली सरकारच्या माहिती खात्याने उत्तर पाठविले. यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेट मीडिया यावर 2015 पासून 2021 पर्यंत प्रदूषण नियंत्रण जाहिरातींवर प्रचार-प्रसार यावर 940 कोटी रुपये खर्च केल्याचे उत्तर दिले. प्रत्यक्ष नियंत्रण प्रदूषण नियंत्रणासाठी किती खर्च केला आणि कोणत्या उपाययोजना केल्या?, यावर मात्र दिल्ली सरकारने कोणतेही उत्तर दिले नाही.

अमित गुप्ता यांनी पर्यावरण खात्याकडे देखील या प्रश्नाविषयी पाठपुरावा केला. परंतु पर्यावरण खात्याने हा प्रश्न पुन्हा माहिती खात्याकडे वळवला. त्यावेळी देखील अमित गुप्ता यांना त्याचे उत्तर मिळालेले नाही.

अमित गुप्ता यांनी पर्यावरण खात्याकडे देखील या प्रश्नाविषयी पाठपुरावा केला. परंतु पर्यावरण खात्याने हा प्रश्न पुन्हा माहिती खात्याकडे वळवला. त्यावेळी देखील अमित गुप्ता यांना त्याचे उत्तर मिळालेले नाही.

असे असताना दिल्ली सरकारमधील मंत्री दिल्लीतील प्रदूषणासाठी दिवाळीत उडविलेल्या फटाक्यांना जबाबदार धरताना दिसत आहेत. प्रत्यक्षात सरकारने जाहिरात बाजीवर 940 कोटी रुपये उडवले आणि ठपका मात्र उडविलेल्या फटाक्यांवर ठेवताना दिसत आहेत. भाजपचे आयटी सेलचे निमंत्रक अमित मालविय यांनी या संदर्भात टीका केली आहे.

शुक्रवारी दिल्लीने प्रदूषणाची अत्यंत धोकादायक अशी 500 मायक्रोग्रामची पातळी गाठली. हवामानाच्या निर्देशांकानुसार दर क्यूबिक मीटरला प्रदूषणाचे 1 ते 50 असे प्रमाण असेल, तर ते चांगले व सुरक्षित समजले जाते. 51 ते 110 असेल, तर समाधानकारक, 102 ते 200 असेल तर सौम्य, 201 ते 300 असेल तर वाईट, 301 ते 400 असेल तर अतिवाइट व 401 ते 500 असेल तर अत्यंत धोकादायक असे समजले जाते. दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार गुरूवारी सायंकाळपर्यंत हे प्रमाण एका क्यूबिक मीटरला 246 झाले. फुफ्फुसासाठी ते धोकादायक होय. दिल्लीशेजारी असलेल्या फरीदाबादमध्ये (454), ग्रेटर नोयडा (410), गाझियाबाद (438), गुरूग्राम (473), नोयडा (456) असे प्रमाण होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!